🕒 1 min read
सिंधुदुर्ग : सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई आणि महाविकास आघाडीचे संतोष सावंत यांना समसमान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने निकाल काढावा लागला. त्यात भाजपचे विठ्ठल देसाई निवडूण आले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे म्हणाले, विठ्ठल देसाई जिंकला. चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो. म्हटलं अरे काय ते…, असं म्हणताच उपस्थितात एकच हशा पिकला.
पुढे राणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना म्हणाले, ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’
- जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, १२ जणांचा मृत्यू
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
