Share

राज्यात पावसाचा जोर वाढला; मराठवाडा, विदर्भ,कोकणासह प. महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं

Published On: 

 नांदेड – राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला काल पावसानं झोडपून काढलं. नांदेड, औरंगाबाद, परभणी, अकोला, वाशिम, सांगली, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. या जिल्ह्यांतील अनेक भाग जलमय झाले तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

हिंगोली जिल्ह्यात 2 प्रवाशांसह एका मोटर पुराच्या पाण्यात वाहून गेली. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काशीद गावाजवळील जुना पूल कोसळून चारचाकी आणि दुचाकी वाहून गेली. दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात 153 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेड शहरातील सरपंचनगर, अंकुरनगर, भावसार चौक, तरोडा खुर्द नांदेड ईथ पावसाचे पाणी रस्त्यावर, घरांमध्ये साचले आहे. या भागातील नागरिकांची दाणादाण उडाली. शहरातील तरोडा खुर्द भागातनेते नागोराव इंगोले मालेगावकर यांनी अन्न उपलब्ध करून दिले. तर काही कुटूंबांची थांबण्याची व्यवस्था केली.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात देखील रविवार दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यानं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवलीतील खारेपाटण इथं सुख नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं खारेपाटणच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटरस्त्याचा काही भाग खचल्यानं या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!