🕒 1 min read
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या नौशेरा या सीमावर्ती भागात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. यावेळी मोदींनी जवानांसोबत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. तसेच यावेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नौशेराच्या जवानांनी गाजवलेल्या या सर्जिकल स्ट्राईकचे पंतप्रधानांनी कौतुक केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, आजही होतात. पण प्रत्येक वेळी इथे तोडीस तोड उत्तर दिलं जातं. असत्याविरुद्ध या मातीत एक स्वाभाविक प्रेरणा आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता. असेही पंतप्रधान म्हणाले.
दीपावली पर्व है अंधकार पर प्रकाश और बुराई पर अच्छाई की जीत का। आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का नौशेरा जाकर देश की रक्षा में तत्पर हमारे सुरक्षा बलों के साथ दिवाली उत्सव मनाना उनकी सुरक्षा बलों के प्रति संवेदनशीलता को दर्शाता है और हमसभी को प्रेरणा देता है। #Diwali pic.twitter.com/FUClupiyAk
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 4, 2021
सर्जीकल स्ट्राईकचा तो दिवस कायम माझ्या लक्षात राहील. मी ठरवलं होतं की सूर्यास्तापूर्वी सर्वजण परत यायला हवेत. मी प्रत्येक क्षण फोन वाजण्याची वाट पाहात होतो. माझा शेवटचा जवान पोहोचला का हे पाहात होतो. आणि आपलं कोणतंही नुकसान न होता आपले जवान यश मिळवून परत आले, असं पंतप्रधान म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला इतर देशांकडे झुकावं लागत होतं. जास्त पैसे खर्च करावे लागत होते. नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू असायची. एक अधिकारी प्रक्रिया सुरू करायचा, पण तो निवृत्त होईपर्यंत ती पूर्णच होत नव्हती. परिणामी जेव्हा गरज पडायची, तेव्हा शस्त्रास्त्र घाईगडबडीत खरेदी होत होती. अगदी सुट्या भागांसाठीही आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून असायचो. पण आता संरक्षण क्षेत्रातल्या स्वावलंबनाचा संकल्प त्या परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग आहे. देशाच्या उत्पन्नाचा ६५ टक्के हिस्सा देशांतर्गत उत्पादित गोष्टींवर खर्च होत आहे. असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- भाजपचा पूर्ण पराभव झाल्यास पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होणार; राऊतांचा दावा
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- ‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
