मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याबाबत केलेले आरोप मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाही मी पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे, कारण पाटील यांची लायकी सव्वा रुपयाचीच आहे. अशी टीका शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली होती. त्यावर भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणेंनी ट्विट करुन टीका केली आहे. लायकीनुसार नुकसानीची किंमत ठरते, संजय राऊत यांनी स्वत:ची किंमत सव्वा रुपये आहे हे ओळखलं अशी टीका निलेश राणेंनी केलीय.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1440537158377373697
संजय राऊतांवर आरोप करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, धापा टाकत ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. हे पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटलांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हंटलंय त्या संदर्भात त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी सव्वा रुपयांची आहे. त्यांची किंमत केवळ सव्वा रुपया आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव


