मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सोशल मीडियाद्वारे जनतेला संबोधित केले. त्यांनी पूर आणि अतिवृष्टीवर भाष्य केले. तसेच तळये गावात झालेल दुर्घटनेवर त्यांनी भाष्य केले. जाहीर केलेल्या पेकेज बद्दल देखील सांगितले. सांगली साताऱ्यातील पूर घटनावर कायमचा निर्णय लावणार. असे ते म्हणले. दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर ते म्हणले की, आरक्षणाचा अधिकार राज्याला देण्याची मागणी केंद्रात आम्ही केली आहे. मला विश्वास आहे कि येत्या २ ते ४ दिवसात यावर निर्णय येईल.
त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची कान ओढले. ते म्हणले, ‘मला विरोध करणार्यांना माझ्या महाराष्ट्रातील जनतेने जुमानले नाही.’ पुढे ते म्हणाले माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठवला आहे. असे ते म्हणले.
दरम्यान, त्यांनी येणाऱ्या सणावर कोरोनाचे निर्बंध पाळावे लागेल. नियमावली देखील काटेकोर पणे पाळावे लागेल. लसीकरण ठराविक टप्प्यात पूर्ण होत नाही तो पर्यंत आपल्याला नियम पाळावे लागेल, आणि तिसऱ्या लाटीला टाळावे लागेल. असे मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल


