Share

आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे पालकांना आरटीई प्रवेशासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ७ ऑगस्टपर्यंत शाळांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती. आरटीई अॅक्टनुसार ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येत नाही. २ ऑगस्टला प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. आरटीई अॅप्लिकेशनसमोर नॉट अप्रोच हे कारण व कागदपत्र तपासणी करणाऱ्या समितीला बंधनकारक आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ६०३ शाळा पात्र आहेत. येथील प्रवेश क्षमता ३ हजार ६२५ आहे ऑनलाइन सोडतीत प्रवेशासाठी ३४७० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आत्तापर्यंत प्रवेशासाठी चार वेळा मुदतवाढ दिली होती. आतापर्यंत २४८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. १४८२ पालकांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत.

१ जुलैपासून ७ ऑगस्टपर्यंत शाळांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत शनिवारी संपली. शिक्षण विभागाकडून पुढील प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये. यासाठी काम करणारा पालक संघाने २ ऑगस्ट नंतर झालेल्या प्रवेशाबाबत चौकशी करावी अशी मागणी आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!