Share

‘…बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’ संजय राऊतांचं आणखी एक सूचक ट्विट’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या गाजत असलेले अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडली बरोबर महिनाभरापूर्वी २५ फेब्रुवारीला हि घटना घडली आणि सिनेमा देखील लाजवेल अशा घडामोडी या प्रकरणात दररोज घडत आहेत. यामध्ये जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील याच घटनानांनी गाजले आणि सामन्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिले. यावरून दररोज माध्यमांमधून आपल्यावर बातम्यांचा भडीमार सुरू आहे.

मात्र अद्याप देखील नवनवीन प्रकरण पुढे येत असून केवळ गुंतागुंत वाढत आहे. यावरून आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरामधून या सर्व आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले. असे सांगण्यात आले आहे. तसेच ‘अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले !’ असे यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीत राहून सातत्याने पत्रकारपरिषदांच्या माध्यमातून भाजपचा हल्ला परतवून लावणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे वेळोवेळी सरकारला सल्ला देत महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा राऊतांनी . ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, असा मजकूर असलेले एक नवे ट्विट केले आहे. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ अशी कॅप्शनही लिहली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!