Share

60 वर्षांवरील व्यक्तींना मोदी सरकार देणार महिन्याला 3000 रुपये,आतापर्यंत 45 लाख लोकांनी घेतला लाभ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: मोदी सरकारने पुन्हा एकदा गरीब श्रमिक आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे गरीब श्रमजीवी लोकांना मोठा आधार मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांचा रोजगार गेला होता. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

‘पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना’ असे या योजनेचे नाव असून ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत म्हणजे 4 मार्च 2021 पर्यंत या योजनेमध्ये 44.90 लाख श्रमिकांनी नोंदणी केली असून यासाठी 18 ते 40 वयोगटापर्यंतच्या व्यक्ती ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे पात्र ठरतात.

या योजनेअंतर्गत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तीला अनुक्रमे 55, 100, 200 असे मासिक पैसे गुंतवावे लागणार आहेत. भारतीय जीवन विमा निगम च्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थ्यांना योजनेत नाव नोंदविन्याकरिता आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक याच्या फोन सर्विस सेंटर ला जाऊन खाते सुरू करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधितांना श्रमयोगी कार्ड दिले जाईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800-267-6888 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!