Share

Sanjay Raut | ज्या पद्धतीने राज्यपालांनी वक्तव्य केलं, तो महाराष्ट्राचा अपमान आहे – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान करणारे असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सर्वचं राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा धिक्कार केला आहे. अपवाद फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच मराठी माणसाला रसातळाला नेण्याचं काम दिल्लीची यंत्रणा करत असल्याचा निशाणा देखील राऊतांनी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. सजंय राऊत यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे 40 आमदार कोणती भूमिका घेणार? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!