अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर घाला घातला आहे. परीक्षा व भरतीच्या तोंडावर अचानक आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुण संतप्त झाला आहे. सरकारने त्वरित याप्रश्नी जबाबदारीने लक्ष घालावे, अन्यथा आता मराठा समाज शांत बसणार नाही असा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे. आ.मुरकुटे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी नेवासे शहरातील खोलेश्वर मंदिरासमोर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायमस्वरूपी टिकावे म्हणून ज्या गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने निर्णय करायला हवे होते परंतु ते न झाल्यानेच न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात सरकार कमी पडले. तसेच फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले तर त्याचे श्रेय फडणवीस सरकारला जाईल, म्हणूनच जाणीवपूर्वक आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कमी पडले, असे मुरकुटे म्हणाले.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी मनोज पारखे, सतीश गायके, सचिन भांड, सचिन नागपुरे, अंकुश काळे, शिवाजी मोरे, उमेश ठाणगे, विकी परदेशी, राजेश उपाध्ये, अमोल कोकणे, गणेश दुधे, प्रताप चिंधे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- मोनिका राजळे
- अहमदनगरमध्ये जनता कर्फ्यू, लॉकडाऊन नकोच; काँग्रेसचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
- आ.लंके यांनी तालुक्यासाठी केलेले कुठलेही एक समाजउपयोगी काम दाखवा- सुजित झावरे
- कंटोंनमेंट झोन वगळता ईतर भागातील हॉटेल्स रिसॉर्टबाबत कार्यप्रणाली जारी
- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आरे दौरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

