🕒 1 min read
नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. दिल्लीत देखील गंभीर परिस्थिती आहे. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एका आठवड्यासाठी दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डिजीटल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाकी राज्यांप्रमाणेच आपणही हा निर्णय घेतला असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. एका आठवड्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींनाच शहरात ये-जा करता येणार आहे.
We are sealing Delhi borders for one week, only essential services will be allowed: Delhi CM Arvind Kejriwal. #COVID19 pic.twitter.com/8fsIQ5JFne
— ANI (@ANI) June 1, 2020
“दिल्लीची सीमा खुली केली तर रुग्ण उपचारासाठी दिल्लीत येतील. दिल्लीत आरोग्य सेवा उत्तम आहे आणि सर्व काही मोफत आहेत, यासाठी लोक दिल्लीत येत असतात. सीमा खुल्या केल्यास दिल्लीत ठेवण्यात आलेले ७ हजार ५०० बेड्स हे दोन दिवसांमध्ये भरून जातील. अशात आपल्याला काय करायला हवं?” असा सवाल केजरीवालांनी दिल्लीकरांना विचारला आहे.
‘बोऱ्हाडे-शेरकर’ प्रकरणात कोल्हेंसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरून निघणार नाही’
पालकांना दिलासा ! शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही : राज्य सरकार
देश कोरोनाच्या विळख्यात मात्र अमित शहा लागले बिहार निवडणुकीच्या तयारीला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
