🕒 1 min read
कोहीमा (नागालँड) : नागालँड मधील मोन जिल्ह्यात अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या २१ पॅरा कमांडो गटातील जवानांनी संशयित अतिरेकी समजून एका कामगारांच्या वाहनावर गोळीबार केला होता. हे कामगार कोळसा खाणीत काम करुन घरी परतत होते. यात एकूण आठ कामगार होते त्यापैकी सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहे. वाचलेल्या एका कामगाराने अमित शहांचा दावा फेटाळला असून वाहन थांबवण्याची कोणतीही सूचना जवानांनी केली नसल्याचे सांगितले आहे.
वाहनामध्ये अतिरेकी नाही, तर खाण कामगार असल्याचे जवानांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी दिली होती.
आता हल्ल्यातून बचावलेल्या २३ वर्षीय शिवांगने अमित शहांनी केलेला दावा फेटाळला आहे. शिवांग म्हणाला, जवानांनी कोणताही इशारा न देता गोळीबार केला. आम्ही पळत नव्हतो. कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घरी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. किती वेळ हा गोळीबार सुरु होता हे आठवत नाही, पण बराच वेळ हे सुरु होतं.
बॉम्बस्फोट झाल्यासारखे आवाज होत होते. त्यांना आम्ही स्पष्ट दिसत होतो अंधारही झालेला नव्हता, तरीही ते गोळीबार करत होते. यानंतर मला एका दुसऱ्या वाहनातून दवाखान्यात नेण्यात आलं. माझ्या भावासह अनेकांचा मृत्यू झाल्याचे मी बघीतले होते, असे शिवांगने सांगितले आहे. शिवांगच्या खांदा आणि छातीवर गोळी लागली आहे. त्याच्यावर आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘उध्दव ठाकरेंचे शेतकरी प्रेम पुतणा मावशीचे; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
- ‘राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे’
- माझ्या जिल्ह्याची ‘ही’ ओळख पुसून काढायची आहे – विजय वडेट्टीवार
- एजाज पटेलने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य
- हेच का तुमचे संस्कार?; शाळेवर हल्लाप्रकरणी जितेंद्र आव्हाड संतप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
