🕒 1 min read
गडचिरोली : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे सुरू करण्याचा निर्णय महाज्योतीच्या माध्यमातून घेतला आहे. अशी घोषणा मंत्री वडेट्टीवार यांनी केली आहे.
त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहाचा लाभ मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष ४३ हजार रुपये प्रमाणे लाभ देण्याचे नियोजन केले आहे. तसेच वैद्यकीय,अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमानुसार गुणवत्ता निकषावर यासाठी निवड करण्यात येणार आहे. अशी घोषणाही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
#OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहाचा लाभ मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष 43 हजार रुपये प्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन केले आहे.वैद्यकीय,अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमानुसार गुणवत्ता निकषावर निवड करण्यात येईल(2/2)
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 21, 2021
१०० मुलींसाठी तर १०० मुलांसाठी आता होस्टेल निर्माण केले जाणार आहे. खाते कोणतेही असो त्यातून न्याय देता येईल का, याचा विचार सरकार अगोदर करते. यासठी त्यांनी ब्रह्मपुरी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच ५०० मुलांना स्वआधार योजनाही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनंत गीतेंनी पवारसाहेबांच्या पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले होते; तटकरेंचा गौप्यस्फोट
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- ‘..तर युपीत रोज अधिवेशन घ्यावे लागेल’, राज्यपालांच्या मागणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया
- ‘सुप्रिया ताई, सोमय्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर; वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

