Share

महाराष्ट्र जिंकणार ! राज्यातील चिंताजनक असलेल्या जिल्ह्यांमध्येही कोरोना रुग्णांचा आलेख उतरता

Published On: 

मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

अशातच, काहीसा दिलासादायक माहिती आता समोर येत आहे. कोरोना स्थिती आटोक्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये अनलॉकची सुरुवात झाली असताना कोरोना रुग्णवाढीची स्थिती चिंताजनक असल्याने कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. तर, कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला होता. आता कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात येण्यास सुरुवात झाल्याचं नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झालं आहे.

जाणून घ्या या सहा जिल्ह्यांमधील सध्याची स्थिती –

कोल्हापूर –

संसर्ग दर- 13.77 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 54.78 टक्के

पुणे –

संसर्ग दर- 9.88 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 10.90 टक्के

सातारा –

संसर्ग दर- 8.91 टक्के
व्यपालेल्या खाटाचे प्रमाण- 37.32 टक्के

रत्नागिरी –

संसर्ग दर- 11.90 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 42.19 टक्के

रायगड –

संसर्ग दर- 12.77 टक्के
व्यपलेल्या खाटा- 14.6 टक्के

सिंधुदुर्ग –

संसर्ग दर- 9.06 टक्के
व्यापलेल्या खाटाचे प्रमाण- 55.20 टक्के

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!