Share

“पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही”, मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी (Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या एकमताने घेण्यात आला. दरम्यान, या पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही, असे वक्तव्य पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,‘आम्ही सर्वांनी सोनिया गांधींना सांगितले की या पराभवाला त्या एकट्या एकट्या जबाबदार नाही. यासाठी गांधी कुटुंब नाही तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे खरगे म्हणाले.

दरम्यान, या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, जर काही लोकांना असे वाटत असेल की या परिस्थितीला गांधी कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, तर आम्ही पक्षासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही पद सोडायला तयार आहोत. मात्र, सोनिया गांधींचा हा प्रस्ताव सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी लगेच फेटाळून लावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!