जालना: भोकरदन तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे, प्लॉटिंग व्यवसाय करण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणले नाहीत म्हणून बुधवारी दुपारी सासरच्यांनी विवाहितेला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात विवाहीतेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठालेवाडी येथे घडली असून या प्रकरणी मयत महिलेचा पती, सासू व सासऱ्याविरुध्द भोकरदन पेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठालेवाडी येथील सुदाम ठाले यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी तालुक्यातील वालसा डावरगाव येथील दैवशाला ऊर्फ आशाबाई वय २८ यांच्या सोबत झाला होता. विवाहांनतर तिला तीन मुली व एक मुलगा असे चार अपत्य आहे. मात्र, मागील एक वर्षांपासून दैवशाला हिला सासरकडील मंडळींनी माहेरहून प्लॉटिंगच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत मागणी केली. त्यासाठी तिचा पती सुदाम ठाले, सासरा धोंडिबा ठाले व सासू लक्ष्मीबाई ठाले यांनी दैवशाला शारीरीक व मानसिक छळ करत होते. याबाबत दैवशालाने वेळोवेळी वडिलांना सांगितले होते. त्यानंतर मुलीला पाच लाख रुपये देतो म्हणून तिच्या वडिलांनी कबूल केले होते. व त्यासाठी जमिन विकल्याचा करारही केला होता, मात्र सासरच्यांनी ऐकले नाही. असा आरोपही विवाहितेचे वडील गणपत वाढेकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
याच वादातून दुपारी एक वाजेच्या सुमारास दैवशाला हिस पती, सासू व सासरा यांनी संगनमत करुन त्यांच्या विहिरीत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोटून दिल्याचे फिर्यादी वरून म्हटले आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून भोकरदन पोलिसांनी पती, सासू व सासरा या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज; अशोक चव्हाणांची जहरी टीका
- औरंगाबादेतील घाटीत लवकरच कोरोना विषयक विशेष अभ्यासक्रम, यातून मिळेल कोविड तज्ञ डॉक्टर्सची फळी!
- भुमरेंच्या अडचणीत वाढ! गोर्डेंचा अर्ज फेटाळला, गुन्हा दाखल करण्याची सुट
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘अजित पवारांमुळे पुण्याची आर्थिक स्थिती इतकी बिकट की पुढील पुढील दहा वर्षे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

