Share

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !

Published On: 

पंढरपूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार ही निवडणूक लागल्याने ती पार पडावीच लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आजच्या संबोधनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

पंढरपूरमधील निवडणूक पार पडेपर्यंत राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक पार पडताच तिथे देखील कडक निर्बंध लागू होतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!