औरंगाबाद : शासनाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात सर्व मागासवर्गीय संघटनांची आरक्षण हक्क कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यभर २० मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आपसातले हेवेदावे विसरून मागासवर्गीयांचे संविधानाने दिलेले हक्क, सोयीसुविधा व आरक्षण टिकविण्याचा निर्धार करण्यात आला.
राज्य शासनाने ७ मेरोजी मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षण रद्द केले. याविरोधात राज्यातील प्रमुख मागासवर्गीय संघटनांच्या ९, १० आणि ११ मे रोजी बैठका घेतल्या. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची एकत्रित ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मजदूर युनियन, आयबीसेफ, कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ, बाणाई यासह इतर मागासवर्गीयांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हरिभाऊ राठोड याची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत आरक्षणवादी, संविधानवादी, मागासवर्गीय व बहुजन संघटना तसेच समाज बांधवांनी आता एकत्रित लढले पाहिजे, याबाबत एकमत झाले. त्याचाच भाग म्हणून आरक्षण हक्क कृती समितीतर्फे २० मे रोजी राज्यभर सर्व मागासवर्गीय संघटना, संस्थेच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. नियम पाळून सर्व संघटना स्थानिक जिल्हाधिकारी, तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मागासवर्गीय मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या निवासस्थानीही आंदोलन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर फुलंब्रीत मोफत धान्य वाटपास सुरुवात!
- ‘चुका काढण्याची किंवा टिका करण्याची ही वेळ नाही,आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढूयात’
- सध्या अशोक चव्हाणांची अवस्था तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखी आहे – सदाभाऊ खोत
- टेंभापुरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांना मिळाले उन्हाळी हंगामातील आवर्तन
- अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले! पोलिसांच्या कारवाईला वेग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

