नाशिक : सरकार पाडण्याची वल्गना भाजपकडून वारंवार केली जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला या मुद्द्यावरुन डिवचलं आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असं सांगतानाच तरही हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
दिल्लीत मी जिथे राहातो. त्या ठिकाणी डोमकावळे आहेत. याबरोबर येथे काही चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत. काही वेळा माझ्या आजूबाजूला मी डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचे सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. कुणी कितीही फडफड आणि बडबड करू द्या त्या कावळ्यांची पिसे झडून जातील, चोची तुटून जातील. पण हे सरकार मजबूत राहील, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांना सुनावले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे. येथे तुळशीचे पीक जास्त आहे. मात्र, काही लोकांना वाटते की येथे गांजा, भांग आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आहात? मी मागेच म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच बाकी राहिली आहे, तेव्हढ एकदा करा, बाकी सगळे झाले. अश्या शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
- ‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात
- औरंगाबादेत प्रत्येक वॉर्डात पालक अधिकारी; आतातरी समस्या सुटतील का चुटकीसरशी?
- सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडेच; मनसेचे शिवसेनेला सडेतोड उत्तर
- संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये; भाजपच्या उपाध्यक्षांचा अजब सल्ला
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

