Share

‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या सरकार पडणार असल्याच्या दाव्याला त्यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्षपणे टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचे सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. तुम्ही संजय राऊतांवर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांदी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही,’ असा दावाही यावेळी राऊतांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!