मुंबई : साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज पीडित महिलेच्या दुःखद निधनाची बातमी मिळताच अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
आरोपींना हे समजलं आहे की, कोणत्याही प्रकारचे अत्याचार केल्यानंतर हे महाराष्ट्र सरकार वाचवतं. राज्य सरकार आपल्या लोकांना वाचवत असतं. आपल्या लोकांना संरक्षण देतं. घडलेल्या घटनांची, मंत्र्यांची नावे बघा, नेत्यांची नावे बघा. प्रत्येक बाबतीत वाचवलं गेलंय म्हणजे गुन्हेगारांना संरक्षणच झालं ना?, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
— Nitesh Rane (@NiteshNRane) September 11, 2021
मुळात कायदा आणि सुव्यवस्था या लोकांच्या हातात राहिलेली नाही. म्हणून या वाढत्या घटना दिसत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री, पुण्यात उपमुख्यमंत्री राहतात. या दोन्ही शहरात राज्याचे प्रमुख राहतात त्याच शहरात असे महिलांवर अत्याचार होत असतील, तर गुन्हेगार हे सरकारचे जावईच झाले आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरे यांच्या ‘त्या’ विधानाशी मी सहमत-चंद्रकांत पाटील
- ‘काँग्रेस आता पक्ष राहिला नाही; बहुतेक जण सत्ता मिळतेय म्हणून सहन करा हेच म्हणतायत’
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- पाणी द्या, नाहीतर टाकीवरुन उडी मारणार; भाजप नगरसेवकाचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन


