🕒 1 min read
नवी दिल्ली : देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या २४ तासात ८८.१३ लाखाहून जास्त मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या आहेत. लसीकरण अभियान सुरु झाल्यापासून एका दिवसातले साध्य केलेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. याबरोबरच भारताच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने ५५ कोटीचा महत्वाचा टप्पा काल गाठला. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी होत आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ६२,१२,१०८ सत्रांद्वारे ५५,४७,३०,६०९ मात्रा देण्यात आल्या आहेत. २१ जून २०२१ पासून कोविड-१९ सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.५१% झाला असून मार्च २०२० पासूनचा हा सर्वोच्च दर आहे. महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण ३,१४,४८,७५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात ३६,८३० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
भारतात १५४ दिवसातल्या सर्वात कमी (२५,१६६) नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. सलग ५१ दिवसांपासून ५०,००० पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’

