मुंबई : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.
यानंतर या विधेयकावर संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे, तर विरोधकांनी नंतर प्रचंड गदारोळ करत हे विधेयक शेतकऱ्यांसाठी जीवघेणं ठरेल असा आवाज उठवत विरोध केला. एवढेच नाही तर, विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने स्वतःच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना माल कोठेही विकण्याचे, निर्बंधमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते तोच पक्ष आज ही आश्वासने अंमलात आणणाऱ्या मोदी सरकारच्या या शेतकरी विधेयकाला विरोध करत आहे, असा निशाणा त्यांनी साधला. तसेच, काँग्रेसच्या घोषणापत्रात असलेल्या या विधेयकाला मोदी सरकारने आज कायद्यात आणल्यामुळे काँग्रेसने राज्यसभेत घातलेला गदारोळ हा निव्वळ द्वेषापोटी केलेला तमाशा आहे, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.
घोषणापत्रात शेतकऱ्यांना माल कोठेही विकण्याचे, निर्बंधमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारा काँग्रेस पक्ष तीच आश्वासने अमलात आणणाऱ्या मोदी सरकारच्या शेतकरी बिलाला विरोध करतोय. स्पष्ट आहे की राज्यसभेत घातलेला गदारोळ हा निव्वळ द्वेषापोटी केलेला तमाशा आहे. pic.twitter.com/vYAWKgmEA1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2020
आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून या कायद्यांविरोधात देशभरातील २०८ शेतकरी संघटना २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करणार आहेत. किसान संघर्ष समितीचे नेते अजित नवले म्हणाले, ” बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारं, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारं, सरकारची जबाबदारी कमी करणारं आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारी 3 विधेयकं केंद्र सरकारने मंजूर केले. त्यांचं आज कायद्यात रुपांतर झालं असं असलं तरी या कायद्यांना संबंध देशभरात प्रचंड विरोध होत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
- नगर-मनमाड महामार्ग दुरावस्थेच्या निषेधार्थ तरुणांनी केले मुंडण आंदोलन
- ‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला
- ‘सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल, माघार घ्यावी लागेल’; २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा अजित नवलेंनी दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

