अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर-मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर उतरून नगर-मनमाड महामार्ग कृती समितीच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले.
नगर-मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या मार्गावर सुरू असते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या खड्ड्याकडे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काल सकाळी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका केली. रोडवर पडलेल्या खड्ड्यात युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडण आंदोलन केले.
यावेळी वसंत कदम, प्रमोद विधाटे, सचिन तारडे, आशपाक सय्यद, अनिल वाणी, प्रभाकर खांदे, अजिंक्य कोळगे, नितीन मोरे आदींनी मुंडण केले. तर क्रांतीसेना पक्ष, मनसे राहुरी फॅक्टरी व अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला होता.
महत्वाच्या बातम्या:-
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
- शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का? संजय राऊत कडाडले
- पावसामुळे नुकसान झाल्याने ३० एकर भुईमुगाला लावली काडी
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

