कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतल्याचे पाहायला मिळत असतानाच पुण्यासह, नाशिक आणि मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
खुद्द राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आंदोलकांना नोटिशी बजावू नका अशी विनंती केल्यानंतर देखील कोल्हापूरातील आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. यामुळे, मराठा आंदोलक आक्रमक झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे.
संभाजीराजेंनी पत्रात काय म्हटल होतं?
“मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणे सुरु केले आहे.
नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करुन आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरु केला आहे.” “मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली.
आज हा लढा स्वतःसाठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.” असा दाखलाही संभाजीराजेंनी दिला.“न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी.
त्या उपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी” अशी मागणी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
- कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
- विजय वडेट्टीवारांची जन्मभुमी बेपत्ता, हरवली गावाची पाटी
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

