इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे एकाही दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. क्रिकेटरसिकांसाठी असलेल्या या खास पर्वणीवर मात्र काल पावसाने पहिल्या दिवशी पाणी फेरले.
त्यामुळे आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर साउथहॅमप्टटनमधल्या ढगांचा फोटो करत, त्याला कॅप्शनही दिले आहे, कॅप्शन मध्ये लिहिले आहे ‘ढग साफ झाले आहेत ज्या सामन्याची वाट पाहत आहोत त्याची होणार सुरुवात’
https://www.instagram.com/p/CQSdYBhqWtg/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. आजचा सामना होणार की नाही याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


