मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, काल पेट्रोल डिझेलचे भाव ५ आणि १० रुपयांनी कमी केले. या ५ रुपयांनी काय होणार? पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर ५ रुपये कमी झाले, जर सर्व देशात भाजपाचा पराभव झाला तर पेट्रोल ५० रुपयांनी कमी होईल. लोकांना कर्ज काढून सन साजरे करावे लागतात.
ते पुढे म्हणाले, मोठ मनं असायला मन असावं लागतं ना, मनच नाही. पेट्रोल डिझेल भाववाढीतून हजारो कोटींनी पैसे कमावले या सरकारने. मोठ्या मनाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमचं मन मोठ नाही तर कुजकं आहे, सडकं आहे. किमान पंचविस रुपये कमी शंभर रुपये वाढवायचे आणि ५ रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?
लोकं पेट्रोल पंपावर येतात, पंधरा पंधरा रुपयांचे पेट्रोल टाकतात, समोर मोदींच्या होल्डींगकडे बघतात आणि मोदी आर्शीवाद देतात आम्हाला मत देल्याची किंमत चुकवा. केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल ना, पेट्रोल डिझेलचे भाव काही राज्य सरकार ठरवत नाही, धोरनात्मक निर्णय तुम्हीच घेतात ना मग बोट कोणाकडे दाखवायचे फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे बोट दाखवायचे का? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सरकारने सतत महागाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शेवटी केंद्र सरकारच या सर्व गोष्टीसाठी जबाबदार आहे. असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- भाजपचा पूर्ण पराभव झाल्यास पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होणार; राऊतांचा दावा
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- ‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

