Share

‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर शरसंधान केले. जम्मू काश्मीर मधील परिस्थिती अतिशय बिकट असून सरकार यावर काहीच बोलत नाही अशी टीका राऊत यांनी मोदीवर केली. तुम्ही ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, चा गैरवापर करता आहात त्यामुळे तुम्ही त्या संस्था बदनाम केल्या आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की ‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते, चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे.आता आदळआपट करून उपयोग नाही जैसी करणी वैसी भरणी

दरम्यान, चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्विट करत लिहिले की, ‘महाविकास आघाडी सरकारला इन्कम टॅक्सआणि ईडीची एवढी भिती का वाटतीये? सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकावर सुनावले आहे.दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीट वर संजय राऊत कश्या प्रकारे प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!