Share

स्रेहलता वसईकरने ‘या’ कारणामुळे घेतला सोशल मीडियापासून दूर होण्याचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मराठमोळी अभिनेत्री स्रेहलता वसईकरने अनेक मलिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेने स्रेहलता घराघरात पोहोचली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत अहिल्याबाईच्या सासूबाईची म्हणजे गौतमाबाईंची भूमिका तिने साकारली आहे. मात्र आता स्रेहलताने सोशल मिडीयापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.instagram.com/p/CVIqpkStT0o/?utm_source=ig_web_copy_link

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनेही माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी काही काळ ऑफलाइन जात आहे,’ तिचीही पोस्ट पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. सोशल मिडियापासून लांब होण्याचे नेमके कारण स्पष्ट कळू शकले नाही. मात्र तिने घेतलेल्या निर्णयाचे अनेकजण सोशल मिडियावर तिचे कौतक करत आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात तिने साकारलेल्या भानूच्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. तिची हि वेगळी भूमिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!