Share

IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणावी, खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा; मिटकरींची मागणी

Published On: 

पुणे : देशात विक्रमी कोरोना रुग्णांची भर पडत असून या संकटातून भारत बाहेर पडावा यासाठी जगभरातून प्रार्थना व मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तर दुसऱ्याबाजूला, देशात आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आयपीएलचे चाहते फक्त देशातच नाहीतर जगभरात आहेत.

मागील वर्षी कोरोनाच्या धोक्यामुळे IPL चा हंगाम UAE मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र, यंदा जानेवारी व फेब्रुवारीमध्ये कोरोनाच संकट आटोक्यात असल्याचं चित्र दिसत असल्याने देशातच निर्बंधांसह आयपीएल सामन्यांचा आयोजन करण्यात आलं आहे. तर, देशातील क्रिकेटपटूंसह परदेशी खेळाडूंनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाल्याने IPL चे उर्वरीत सामने रद्द करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

काही बॉलिवूड कलाकार, परदेशी क्रिकेट खेळाडू यांच्या पाठोपाठ राजकीय नेत्यांनी देखील IPL सामन्यांवर आक्षेप घेतला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सामन्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ‘IPL च्या मॅचेसवर केंद्र सरकारने बंदी आणावी. कोरोना सारख्या महामारीच्या काळात IPL च्या मॅचेस कशासाठी व कोणासाठी?? तात्काळ मॅचेस वर बंदी आणायला हवी,आणि जनतेच्या जीवावर श्रीमंत होणाऱ्या क्रिकेटच्या खेळाडूंनी आपला खजिना गोरगरिबांसाठी खुला करायला हवा.’ असंही मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!