सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राणेंना काल अटक करण्यात आली होती. त्यावरुन भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शेलारांनी ठाकरे सरकारला जोरदार टीका करत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
शेलारांच्या या मागणीनंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू आहेत. यांना जे जे लोक विरोध करतील त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ट लावायचं ही भाजपनं केलेली रणनिती आहे. त्यामुळे त्यांना किती चौकश्या लावायच्या त्या लावू देत,’ अशा शब्दांत विनायक राऊत यांनी शेलारांच्या इशाऱ्याचा समाचार घेतला.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ?
राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. या अटक सत्रामध्ये मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप केलेला दिसतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. यासोबतच, ‘या प्रकरणाची सीबीआय चौकशी का होऊ नये? हे सर्व केंद्रीय मंत्र्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय मार्फत अनिल परब यांच्यापासून ते तेथील स्थानिक आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आशिष शेलारांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी थांबणार नाही…’; उर्वरीत जन आशीर्वाद यात्रेबाबत नारायण राणेंची घोषणा
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


