Share

भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी

Published On: 

इंग्लंड : लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर भारताचा संघ अधिक आत्मविश्वासाने उतरला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली. इंग्लंडने लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताचा पहिला डाव ७८ धावांवर आटोपला आहे. या सामन्यात भारताने मागील संघ कायम ठेवण्यात आला आहे.

गेल्या कित्येक सामन्यानंतर कर्णधारण विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. दोन खेळाडू वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दोन आकडी संख्या देखील गाठता आली नाही. आणि ज्या खेळाडूंनी दोन आकडी संख्या गाठली ती २० धावांहून अधिक नाही. आता इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्याकडे अधिक धावांनी आघाडी घेण्याची भक्कम स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा याने १०५ चेंडूंमध्ये १९ धावा तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने ५४ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. सलामीवीर के एल राहुलसह मागील सामन्याच्या विजयाचे स्टार मोहम्मद शमी आणि बुमराह हे खाते न उघडताच बाद झाले. या पाच कसोटी सामन्यात भारत १-० ने आघाडीवर असून हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!