Share

शतक न होण्यामागचे पंतने सांगितले मोठे कारण, म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक हुकल्यानंतर त्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, शतक न झाल्यामुळे दु:ख झाले. परंतू मी व्यक्तिगत रेकॉर्डकडे जास्त लक्ष देत नाही.

पंतने मोहाली येथे श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ताबडतोब फलंदाजी करत ९७ चेंडूत ९६ धावा केल्या. ५ नंबरला आलेल्या पंतने सुरुवातीला थोडा वेळ घेतला. परंतु नंतर त्याने श्रीलंकन गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवला. त्याच्या या खेळीचा अंत सुरंगा लकमलने त्रिफळा उडवून केला. या खेळी दरम्यान त्याने ४ जबरदस्त षटकार लगावले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याला एक प्रश्न विचारण्यात आला की, शतक हुकले त्याचे दु:ख वाटत नाही का? यावर पंत म्हणाला की, मी याबद्दल जास्त विचार करत नाही. मी व्यक्तिगत रेकॉर्डलाही जास्त महत्व देत नाही. कधी कधी वाटते की मी शतक बनवू शकलो असतो. परंतु यावर मी जास्त लक्ष देण्याचा विचार करत नाही. पंत आतापर्यंत ९० ते १०० च्या दरम्यान बरायचं वेळा बाद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!