Share

अर्णब वरील कारवाई ही महाविकास आघाडीने अन्वय नाईकांना वाहिलेली श्रद्धांजली! – सचिन सावंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु असतानाच अन्वय नाईक यांच्या पत्नीने व मुलीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतानाच अर्णबवर गंभीर आरोप देखील केले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलं आहे. ‘गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई ही दिवंगत अन्वय नाईक यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने वाहिलेली श्रद्धांजली आहे. हा त्यांना व त्यांच्या परिवाराला दिलेला न्याय आहे. तर, फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबले होते, असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!