🕒 1 min read
मुंबई : सुर्यकुमार यादव या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने केलेली कामगिरी पाहता; या खेळाडूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘भारतीय संघात स्थान का मिळाले नसावे’ हा मुद्दा क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावलेला आहे.
सोशल माध्यमांमध्ये सुद्धा हा मुद्दा बऱ्याच प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. या खेळाडूची अशी चांगली कामगिरी ही केवळ या IPL मधली नसून, गेल्या ३ वर्षात हा खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला आहे.
यावर आता टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी मौन सोडलंय. सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान का मिळत नाही यावर त्यांनी उत्तर दिलंय. रवी शास्त्री म्हणाले, सध्या टीम इंडियामध्ये अनेक चांगले आणि तरुण खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत 30 वर्षीय खेळाडूला संधी मिळणं फार कठीण आहे. म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देत आहे.
“इतकंच नव्हे तर सुर्यकुमार यादव प्रमाणे आणखी 3-4 खेळाडू असे आहेत. ज्यांनी चांगली कामगिरी करून त्यांना टीममध्ये स्थान मिळालं नाहीये. टीममध्ये जेव्हा अनुभवी आणि तरुण खेळाडू भरलेले असतात अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण असतं,” असंही ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
- गेल्या दोन महिन्यात सक्रीय रुग्णसंख्येची टक्केवारी तिपटीने घटली ?
- १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने राज्यात औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – राष्ट्रवादी
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
