🕒 1 min read
अहमदनगर:- संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) च्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे.
शरद पवार यांचे नाव यूपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, असे शिवसेनेचे मत असले तरी कॉंग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही. कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. शरद पवार यांच्याबाबत मला आदर आहे. पण पवार यांना यूपीए अध्यक्षपद मिळणे अशक्य आहे. कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष पद देण्याची संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीमुळे सरकारमध्ये मतभेद होतील, व हे सरकार पडू शकते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर सरकार पडेल. हे सरकार पडल्यावर आम्हाला सरकार बनवण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कोणता पक्ष व आमदार आमच्याकडे येऊ शकतात, ते आम्ही पाहू व बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आठवले म्हणाले. जर राज्यातील सरकार पडले तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- भुजबळ, वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- प्रकाश आंबेडकरांचा समाजाला कुठलाही फायदा झालेला नाही; रामदास आठवलेंची टीका
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
