मुंबई: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज त्यांना कराड येथेच पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. दरम्यान यावरूनच अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
‘भाजपा नेते किरीट सोमय्या यांना कराड येथे रोखलं असून कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. मात्र अशा मुस्कटदाबीने आपण जनतेचा आवाज बंद करू, भ्रष्टाचारावर पांघरूण घालू असा भ्रम जर ठाकरे सरकारला असेल तर त्यांनी या भ्रमातून वेळीच बाहेर यावे.’ असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत दिला आहे.
भाजपा नेते @KiritSomaiya यांना कराड येथे रोखलं असून कोल्हापूरला जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.
अशा मुस्कटदाबीने आपण जनतेचा आवाज बंद करू, भ्रष्टाचारावर पांघरूण घालू या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे. pic.twitter.com/wfZbTE1bo3— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2021
दरम्यान किरीट सोमय्या यांच्या पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी याठिकाणी घोषणाबाजीही केली आहे. तर याप्रकरणी सकाळी 9 वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- ‘ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळस; सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट


