Share

‘ठाकरे सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवलं, त्यांची वृत्ती रक्तपिपासू’; आशिष शेलारांचा घणाघात

Published On: 

सांगली : गेल्यावर्षी पासून कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे. ठाकरे सरकारच्या अपयशामुळेच राज्यात कोरोनाचा प्रसार फोफावला आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

‘महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची देशाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केलं आहे. राज्यात ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहते. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे,’ अशी टीका भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगत बियाणे, पीक विमा अशा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे देखील शेलार म्हणाले. केंद्र सरकारने दिलेल्या लशी लोकांना देण्यात नियोजन न झाल्यान हेे केंद्र सरकारला दोष देतात. हे दुटप्पी सरकार आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडल पाहिजे, असंही शेलार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!