Share

“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कसोटी मालिका जिंकू शकणार नाही”

Published On: 

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल माजी सलामीवीर आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राने या मालिकेच्या स्कोअरलाइनबद्दलही सांगितले आहे. त्याच्या मते यावेळीही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. आकाश चोप्राने सांगितले की, ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहू शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याची सुरुवात बॉक्सिंग डे-टेस्टने होईल. या मालिकेपूर्वी भारतीय संघ आपल्या तयारीत व्यस्त आहे. कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. यावेळी संघाला सुवर्णसंधी आहे.

मात्र, संघाचे फलंदाज तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, ही मालिका दक्षिण आफ्रिका असेल जिंकू शकेल भारत जिंकू शकत नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “मला वाटत नाही की यावेळीही भारतीय संघ जिंकू शकेल. हे खूप कठीण दिसत आहे. जर एनरिक नॉर्टजे खेळत असेल तर मी म्हणालो असतो की दक्षिण आफ्रिआ 2-1 ने मालिका जिंकेल पण तो खेळत नाहीत त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत राहील असे मला वाटते.”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!