नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल माजी सलामीवीर आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राने या मालिकेच्या स्कोअरलाइनबद्दलही सांगितले आहे. त्याच्या मते यावेळीही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. आकाश चोप्राने सांगितले की, ही मालिका १-१ अशी बरोबरीत राहू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याची सुरुवात बॉक्सिंग डे-टेस्टने होईल. या मालिकेपूर्वी भारतीय संघ आपल्या तयारीत व्यस्त आहे. कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. यावेळी संघाला सुवर्णसंधी आहे.
मात्र, संघाचे फलंदाज तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, ही मालिका दक्षिण आफ्रिका असेल जिंकू शकेल भारत जिंकू शकत नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “मला वाटत नाही की यावेळीही भारतीय संघ जिंकू शकेल. हे खूप कठीण दिसत आहे. जर एनरिक नॉर्टजे खेळत असेल तर मी म्हणालो असतो की दक्षिण आफ्रिआ 2-1 ने मालिका जिंकेल पण तो खेळत नाहीत त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत राहील असे मला वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी…- संजय राऊत
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
- चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

