🕒 1 min read
मुंबई : देशपातळीवर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमातून अपप्रचार केला जातो. यामागे भाजपचे नेते तसेच भाजपचे आयटी सेल कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
भाजपाच्या आयटी सेलकडून तसेच इतर समाजसंटकांकडून होणाऱ्या अपप्रचाराविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. देश पातळीवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम समाजमाध्यमातून केले जात आहे. तसेच यामागे भाजप आणि भाजपचा आयटी सेल आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.
देश पातळीवरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरीता समाजमाध्यमातून होणाऱ्या अत्यंत व्देषपूर्ण अपप्रचारावर नियंत्रण आणून भाजपा आयटी सेल व इतर समाजकंटकांवर कारवाई करण्याकरीता मी मा. मुख्यमंत्री @OfficeofUT @bb_thorat @AnilDeshmukhNCP @satejp यांना पत्र लिहून मागणी केली आहे pic.twitter.com/6tIIPw2z4G
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 29, 2020
लोकांमध्ये द्वेष पसरवणे, जाणीवपूर्वक ट्रोल करणे, खोट्या बातम्या पसरवणे, इतर नेत्यांचे चारित्रहनन करणे इत्यादि काम भाजपचे आयटी सेल करत असते. यासाठी भाजप हजारो कोटी रुपये खर्च करते. यासाठी त्यांनी काही खाजगी कंपन्या नियुक्त केल्या आहेत, असं सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.सायबर कायदा बऱ्याच अंशी कमजोर झाला आहे. याचाच फायदा भाजपची मंडळी घेत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते तर समाजमाध्यमातून खुल्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा ,समाजमाध्यमात वापरत असतात. यातून देशाची आणि राज्याची सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे या अपप्रचारावर नियंत्रण आणून समाजकंटकावर कारवाईचा विचार व्हावा,’असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

