मुंबई : आयपीएल पाठोपाठ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टि-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी बीसीसआयला आयपीएल स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करणे गरजेचे आहे.
येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४व्या पर्वाची सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर आयपीएल स्पर्धेचा अतिंम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे होईल. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टि-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्याच्या तयारीचा पाया आयपीएल आयोजनातून रचला जाणार आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे समोरील आव्हानं अधिक वाढली आहेत. अशात बीसीसीआयला आयपीएलच्या यशस्वी आयोजन करावेच लागेल.
आयपीएल २०२१साठी निवडण्यात आलेल्या सहा स्टेडियमवरच टि-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे. आयसीसी नियमानुसार विश्वचषत स्पर्धेसाठी निवडलेल्या ठिकाणांची घोषणा सहा महिने आधीच करावी लागते. त्यामुळे बीसीसीआय तशी घोषणा लवकरच करेल, अशी अपेक्षा आहे. टि-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलवरून चर्चा सुरू आहे. चेन्नई व बंगळुरू येथे सेमीफायनलचे सामने आयोजीत करण्याचा मानस बीसीसीआयचा आहे तर अहमदाबाद येथे विश्वचषक स्पर्धेची फायनल खेळवली जाईल.
महत्वच्या बातम्या
- जिंतूर रस्ते विकासासाठी ११२ कोटींचा निधी
- महंगाई की मार! पेट्रोल-डिझेल नंतर आता खत ही महागले
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- नोकरीचे आमिष दाखवत साडे आठ लाख रुपये उकळले
- परभणी डीसीसी निवडणूक; महाविकास आघाडीत जागेच्या वादावरून बिघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

