बीड: कोरोना काळातही आपली जबाबदरी चोखपणे पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत हे कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीदरम्यान संबंधित अधिकार्यांना त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची २१ प्रकरणे प्रलंबित आहेत, ही सर्व प्रकरणे तातडीने संबंधित विभागांनी कार्यवाही करून मार्गी लावावीत असे निर्देशही दिले त्यांनी यावेळी दिले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा अनुशेष भरून काढणे, वारसा हक्क कायदा, ठेकेदारी पद्धत बंद करणे याबाबतची कार्यवाही नगर विकास विभागाने तात्काळ करावी, असे सूचित केले आहे. घनकचऱ्याशी संबंधित कामगारांना सफाई कामगार पदनाम देऊन लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे हास्यास्पद आहे’, ‘बेस्ट ऑफ थ्री’च्या मुद्द्यावर अश्विनने सोडले मौन
- विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनी गुप्त बैठकांचा धडाका का सुरु केला आहे ?
- सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका, मात्र सरकारच्या कमाईत वाढ
- चहलच्या पत्नीची मनमोहक अदा पाहून चाहते पुन्हा पडले प्रेमात!
- पडळकरांनी टीका करताना तारतम्य बाळगावे, मात्र मर्यादांचे पालन राष्ट्रवादीलाही करावेच लागेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

