Share

ठाण्यात ४ करोनाबाधितांचा संशयास्पद मृत्यू, राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसतोय. यातच काही रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांमुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागला. ही प्रकरणं ताजी असतानाच आज ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असलेल्या वेदांत या कोविड रुग्णालयात चौघांचा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक गोष्ट घडली.

या मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णालयानं हे आरोप फेटाळले आहेत.

या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!