बीड : जिल्ह्याच कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दिवसभराच तब्बल विक्रमी १०६२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक अंबाजोगाईमध्ये २२३ रुग्ण आढळले आहेत. तर आष्टी १९३, बीड २२०, धारूर ३०, गेवराई ६४, केज १०६, माजलगाव ३४, परळी ७५, पाटोदा ५३, शिरूर ४५, वडवणी १९ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्युचा आकडाही वाढू लागला आहे.
अंबाजोगाईमध्ये कोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या रुग्णालयात मृत रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या ४८ तासात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सात जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर रविवारी सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तीन जणांचे अंत्यसंस्कार वेटिंगवर आहेत.
दरम्यान, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. लातूर येथून अंबाजोगाईला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जाते. पण लातूर येथे ऑक्सिजनसाठीही वेटिंग आहे. एकीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण वेळेत ऐनवेळी ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन कधी होणार ? टास्क फोर्सनंतर आता मुख्यमंत्र्यांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

