औरंगाबाद : सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. पूजा नवलसिंग कायटे (वय २४) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजाचा विवाह २०१३ मध्ये भिलदरी येथील नवलसिंग कायटे याच्याशी झाला. पूजाच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने मामा इंदल लकवाल यांनी स्वतःची एक एकर जमीन विकून तिचे लग्न थाटामाटात लावून दिले. दीड ते दोन वर्षे सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविल्यानंतर शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली.
परंतु माहेरी गरिबी असल्याने व मामाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने सासरच्या लोकांनी पूजाला तिच्या मामाकडे गल्ले बोरगाव येथे आणून घातले होते. सासरच्या लोकांना समजावून सांगितल्याने पूजाला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. दीड ते दोन वर्षानंतर पती नवलसिंग व दिर अर्जुन कायटे यांनी पुन्हा पीक अप गाडी घेण्यासाठी दोन लाखाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने नवरा, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मामा लकवाल यांनी कसेबसे जमवाजमव करून चाळीस हजार रुपये दिले होते.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता पूजाने मामा लकवाल यांना फोन करून नवरा, सासू, सासरा, दिर जास्तच त्रास देत असल्याचे सांगितले. दरम्यान पूजाच्या पतीने पिशोर पोलीस ठाण्यात मध्यरात्री बारा वाजता बेपत्ता असल्याची खबर दिली.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आक्रमक होऊन परिस्थिती चिघळल्यास भाजप सरकारच जबाबदार असेल – शरद पवार
- सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आठवलेंचा सन्मान !
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने राष्ट्रवादीला दिली तब्बल ५ कोटींची देणगी
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
