औरंगाबाद : गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा वाढणारी रुग्ण संख्या पाहता कडक निर्बंधांमुळे औरंगाबाद एसटी विभागाला दररोज ३० ते ३५ लाखांचा तर महिनाभरात सरासरी १ कोटींपर्यंत नुकसान सोसावे लागत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊन नंतर २० ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. पाच महिन्यात झालेले आर्थिक नुकसान भरत होते. मात्र मार्च महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. शनिवार रविवार कडक लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आले. आता ब्रेक द चेन चे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूकीला परवानगी असली तरीही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे एसटी महामंडळावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावले आहे.
अनलॉक नंतरच्या काळात एसटी महामंडळाला औरंगाबाद विभागातून दररोज ५० ते ५५ लाखांच्या घरात कमाई होत होती. मात्र आता पुन्हा एकदा आपण लॉकडाऊनच्या वाटेवर आहोत. सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिस्थितीत सध्या एका दिवसात केवळ १५ ते २० एसटीला मिळत आहे. परभणी, नांदेडच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुणे, जळगाव, नाशिकच्याही फेऱ्या सध्या प्रवांशाअभावी कमी करण्यात आलेल्या आहेत.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाउनच्या ट्विटनंतर महेश कोठारे सोशल मीडियावर ट्रोल
- लातूर; कडक निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन
- अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’
- शुभेच्छा देत राज्यपाल कोश्यारी यांनी केले गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन
- ‘राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मात्र परप्रांतीयांनी गावी जाऊ नये, सरकार काळजी घेईल’


