Share

‘राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मात्र परप्रांतीयांनी गावी जाऊ नये, सरकार काळजी घेईल’

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

यामुळे राज्याच्या विविध भागासह परराज्यातून उपजीविकेसाठी मोठ्या शहरात आलेल्या कामगार-मजूर वर्गाने पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली आहे. गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन केल्यामुळे मजुरांना अक्षरशः पायी गावी जावे लागले होते. यावेळी त्यांची मोठी हालअपेष्टा झाली होती. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच या लोकांनी गाव गाठण्यासाठी मिळेल रेल्वेसह मिळेल त्या साधनाने गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन होण्याच्या भीतीने परप्रांतीय मजुरांनी महाराष्ट्रातून जाऊ नये, राज्य सरकार त्यांची सोय करेल, असं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे. कामगार मंत्रीपदाचा कार्यभार देखील आता हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. ते म्हणाले, ‘राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये.’

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!