नगर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देशातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील तुटवडा कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रुग्णांची वाढती संख्या व काही परवानग्यांअभावी निर्यात प्रक्रियेतील रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा अद्यापही कंपन्यांकडेच आहे. यावरून राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आहे. तो साठा कुठल्या राजकीय पक्षांना नाही तर राज्य सरकारांना द्यावा म्हणजे तो जिल्हाधिका-यांमार्फत गरजू रूग्णांपर्यंत पोहोचवता येईल@MahaDGIPR @INCMaharashtra pic.twitter.com/55NzekvWIJ
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 19, 2021
दरम्यान, ‘रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आहे. तो साठा कुठल्या राजकीय पक्षांना नाही तर राज्य सरकारांना द्यावा म्हणजे तो जिल्हाधिका-यांमार्फत गरजू रूग्णांपर्यंत पोहोचवता येईल,’ अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- बीडमध्ये २८०० रेमेडेसिवीर इंजेक्शन होणार उपलब्ध !
- …तेव्हा नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या कन्येचं भाजपला सडेतोड प्रत्युत्तर !
- सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे फडणवीसांना अटक करा – चाकणकर
- दिल्लीत ६ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा; आता देशाच काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

