मुंबई : श्रीरामपूर, अहमदनगर येथे लव्ह जिहादची गंभीर घटना घडली असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून एफआयआरमध्ये संशयित आरोपीचे नावदेखील नाही. संताप व्यक्त करण्यासाठी लोकांनी काढलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली. याप्रकरणी राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी ही माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. त्यात ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रात लव जिहादची वाळवी वेगाने पसरते आहे. भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना फसवून जाळ्यात ओढले जात आहे. श्रीरामपूरमध्ये एक १४ वर्षाची मुलगी याचा ताजा बळी आहे. महाराष्ट्रात तातडीने लव जिहाद विरोधी कायदा करा. हा जिहाद रोखा.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रात लव जिहादची वाळवी वेगाने पसरते आहे. भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना फसवून जाळ्यात ओढले जात आहे. श्रीरामपूरमध्ये एक १४ वर्षाची मुलगी याचा ताजा बळी आहे. महाराष्ट्रात तातडीने लव जिहाद विरोधी कायदा करा… हा जिहाद रोखा. pic.twitter.com/ILKDC2qfTR
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 9, 2021
दरम्यान, बेलापूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सिकंदर शेख नावाच्या मुलाने फूस लावून पळविल्याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. हे कुटुंब भटक्या विमुक्त समाजातील असून विळे, खुरपे विकण्याचा या कुटुंबाचा व्यवसाय आहे. पळवून नेलेल्या मुलीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. चार मुली व एक मुलगा असा या महिलेचा परिवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार, खासदार संजय जाधव यांचे विधान
- नीरज चोप्राप्रमाणेच राखी सावंतने फेकला भाला ; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
- शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- पुन्हा मूक आंदोलनाची सुरुवात; मराठा समाजाच्या मागणीनंतर संभाजीराजेंची घोषणा


