🕒 1 min read
मुंबई : ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी त्यांनी, ‘मी चांगली कार चालवतो की नाही माहीत नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे,’ असं विधान केल्यानंतर उपस्थितांमध्ये हाशा पिकला होता.
‘मी उत्तम गाडी चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर त्यांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘स्टेअरिंग त्यांच्या हातात आहे आणि अनेक अडथळे समोर आहेत हे आम्हाला सर्वांना दिसतंय. पण तरीदेखील त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे.’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी ग्रामपंचायती निवडणुकांवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र देखील सोडलं. ‘भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व हे फार मर्यादित आहे’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा आहे : राहुल गांधी
- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं लक्ष्यवेधी ट्विट
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
- ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने मी-मी म्हणणाऱ्यांचा माज उतरला, नाव न घेता अर्जुन खोतकरांचा दानवेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
